Advertisement

१६ वर्षीय तरुणाचा पाटात पाय घसरून मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 25/05/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.25 मे – माजलगाव तालुक्यातील उमरी येथे मामाच्या गावी आलेल्या युवकाचा पाटात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी रात्री सहाच्या वाजण्याच्या सुमारास घडली.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोनपेठ येथील बालाजी उध्दव शिंदे वय 16 वर्षे हा युवक उमरी येथे मामाच्या गावी उन्हाळ्याचा सुट्ट्या मध्ये आला होता. तो मामा सोबत शेतात गेला होता. मामा कामात व्यस्त असतांनाच बालाजी हा जवळ असलेल्या पाटात पाणी पिण्यासाठी गेला. मात्र पाणी पित असतांना त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला.

 

 

पाटात पडलेल्या बालाजीला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी माजलगावच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद दिंद्रुड पोलिस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास दिंद्रुड पोलिस ठाण्याचे पो.काँ बी.के. सुरेवाड हे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement