Advertisement

 वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

प्रजापत्र | Saturday, 25/09/2021
बातमी शेअर करा

  
अंबाजोगाई- सोयाबीन काढण्यासाठी सकाळी शेतात गेलेला शेतकरी पुराचे पाणी शेतात घुसल्याने त्यात वाहून गेल्याची घटना तालुक्यातील तडोळा येथे शुक्रवारी( दि. २४) रोजी घडली होती. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने त्याचा मृतदेह शनिवारी ( दि. २५) सकाळी सापडला.

राम बाबासाहेब कदम ( वय ३०) हा शेतकरी शेतात सोयाबीन काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी गेला होता. त्याला शोधण्यासाठी पथक दाखल झाले होते. या पथकाने नदी पात्रात शोध घेतला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मृतदेह शोधण्यास या पथकाला यश आले नव्हते. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने शनिवारी( दि. २५) सकाळी हा मृतदेह तडोळा येथील नदीपात्रातच एका झुडपाला अडकलेला नागरिकांना दिसून आला.

Advertisement

Advertisement