Advertisement

धारुर घाटात अपघात; एक ठार तीन जखमी

प्रजापत्र | Friday, 12/03/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.12 मार्च - तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच असून आज दि.11 शुक्रवार रोजी पहाटे सहाच्या सुमारास कार व दुचाकीचा अपघात आरणवाडी जवळील घाटात घडला आहे. या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

किल्ले धारूर घाटामध्ये राष्ट्रीय महामार्ग 548 सी  वर आज सकाळी सहाच्या सुमारास कार व दुचाकीचा अपघात  झाला. एम एच 20 एफ पी 4132 ही कार औरंगाबाद येथून लातूरकडे जात असताना तेलगाव कडे जाणार्‍या मोटर सायकलला धडकली. या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. मयताचे नाव शैलेश पवार (रा.जिंतूर) असल्याचे कळते. जखमीला किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये  दाखल करण्यात आले आहे. यात एक वर्षाच्या रुद्र रंगनाथ मुंडे या बालकासह प्रवीण हरिदास कातळे, विलास हरिदास कातळे रा.कुंभारी या दोघांचा समावेश आहे. यातील प्रवीण यास गंभीर मार लागल्याने अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.

काल तेलगाव येथे बीड परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तर अंबेवडगाव येथे दि.4 मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होवून एक तरुण ठार झाल्याची घटना घडली होती. राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर वाढती वाहतूक व घाटातील अवघड वळणे अपघाताचे कारण ठरत आहे. येथील घाट रुंदीकरणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने घाटात तासन तास वाहतूक खोळंबत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

Advertisement