Advertisement

 दि.१३ - महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केलं आहे.हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

            तसेच ज्या व्यक्तिची प्रतीमा मलीन झालेली असते, ज्यांच्या विरोधात गंभीर आरोप असतात अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जातं. मात्र तेच तिकीट एखाद्या महिलेला राजकीय पक्षांना द्यावंसं वाटत नसल्याचं रेखा शर्मा म्हणाल्या.

           दरम्यान, महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार संसदेत आणि विधिमंडळात असणं आवश्यक आहे. अन्यथा त्या फक्त घरातील काम करत राहतील. जर महिलांना तिकीट द्यायचं झालं तर महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत डावललं जात असल्यातं शर्मा यांनी म्हटलं आहे.
 

Advertisement

Advertisement