Advertisement

 पुरात वाहून युवकाचा दुर्दैवी मृत्यू     

प्रजापत्र | Tuesday, 13/07/2021
बातमी शेअर करा

 वडवणी (वार्ताहार )- मामाला माजलगावला सोडून येताना २२ वर्षीय भाच्याचा नदीच्या पुरात वाहून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.पिंपळनेर ता.जि.बीड येथील २२ वर्षीय मयुर विश्वानाथ थोरात हा युवक काल स्वताच्या दुचाकीवरुन मामाला माजलगांव येथे सोडण्यासाठी गेला होता.

 

 

सायंकाळी परत येत आसताना देवडी फाटा येथेच जोरदार पाऊस सुरु आसताना याठिकाणी थांबला परस्थिती घरच्या मंडळीना सांगून मला घरी यायला उशीर होईल असे सांगितले व पाऊस कमी होताच युवक पिंपळनेर मार्गे निघाला यात मोरेवाडी-सुर्डी पुलाजवळ येताच पुलावरुन पाणी वाहत आसताना आणि पाण्याचा ओघ लक्षात न आल्याने मयुर थोरात यांचा दुचाकीवरुन तोल गेला आणि यामध्ये त्याचा दुदैवी मृत्यु झाला.तर मयुर थोरात घरी आलाच नसल्याने घरच्या मंडळीनी त्यांचा शोध घेतला असता लिमगांव शिवारात माजलगांव धरणाच्या पायथ्याशी त्यांचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली आहे.तर सदरील पुलाची अत्यंत जीर्ण अवस्था झालेली आहे.असे सांगण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement