Advertisement

पूजा चव्हाणचा खून झालाय-शांता राठोड

प्रजापत्र | Sunday, 28/02/2021
बातमी शेअर करा

परळी-पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं असताना घटनेच्या १८ दिवसानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. आता या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होणार आहे. पूजा राठोडची चुलत आजी शांता राठोड रविवारी (दि.२८) गुन्हा दाखल करणार आहेत. शिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. तसेच फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शांता राठोड या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार आहेत.
 शांता राठोड म्हणाला की, पोलिसांचं म्हणणं आहे की, पूजाच्या मृत्यूला १८ दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांता  यांनी सांगितलं. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असंही शांता  राठोड यांनी सांगितलं.
शांता राठोड म्हणाल्या की, संजय राठोड, अरुण राठोड, विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा करणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नाही, असंही शांता राठोड यांनी म्हटलं आहे.

 
पूजाचा खून झाला
त्या म्हणाल्या की, अरुण राठोडला खुप मोठं आमिष दाखवलं आहे. अरुण राठोड हा त्याच्याच घरी आहे, दिवसा बाहेर असतो रात्री घरी येतो. पूजाच्या आई वडिलांनी सत्यासाठी बाहेर यायला हवं . त्यांच्या घरच्यांवर दबाव, त्यांना लेकरांची किंमत नाही. पुजाचा खून झालाय, पूजा डॅशिंग मुलगी होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement